दशकभरापूर्वी मध्यमवर्गावर ‘ब्रँड आमीर खान’च्या असलेल्या मोहिनीमुळे असा सिनेमा अगदी सहजपणे तगून गेला असता, परंतु आज ‘लालसिंग चढ्ढा’च्या अपयशाने त्या ब्रँडच्या शेवटावर शिक्कामोर्तब केले आहे!

‘ब्रँड आमीर खान’ला लागलेले ग्रहण खूप मोठा धडा देताना दिसत आहे. आजचे प्रगतीशील राजकारण हा सत्तेत प्रभावी स्थानी असलेल्या नीतिवानांच्या कृतीचा परिपाक जराही नाही, तर राजकीय संघर्षात टिकून राहण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून त्यांना सत्तेच्या पटावर चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचा हा परिणाम आहे. जाहीर दिलगिरी व्यक्त करून आणि आपल्या देशभक्तीची ग्वाही देऊनही, आमीर या सिनेमाला अपयशापासून रोखू शकला नाही.......